ब्रह्मगिरी फेरीसाठी प्रशासनाचे असे आहे नियोजन... या सुविधा मिळणार...

Share:
Main Image
Last updated: 20-Aug-2026

दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) २० ऑगस्ट - श्रावण महिन्यानिमित्त त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन त्यांना सर्व आवश्यक मूलभूत सोयीसुविधा पुरवण्याचे निर्देश नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीस खासदार राजाभाऊ वाजे, आमदार प्रा. देवयानी फरांदे, सरोज अहिरे, गोकुळ गिते, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

प्रशासनाचे नियोजन आणि मुख्य सोयीसुविधा:

आरोग्य पथके व रुग्णवाहिका: ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्ग आणि गंगाद्वार या अत्यंत गर्दीच्या ठिकाणी आपत्कालीन स्थितीसाठी स्वतंत्र आरोग्य पथके व रुग्णवाहिका तैनात ठेवल्या जातील. शहरात जुने रुग्णालय श्रावण संपेपर्यंत सुरू राहील.

Advertisement

वाहनतळ व निवारा व्यवस्था: पार्किंगच्या ठिकाणी वीज, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि प्रथमोपचाराची सोय असेल. तसेच ५ हजार भाविकांच्या क्षमतेचा विशेष मंडप उभारला जाणार आहे.

स्वच्छता व दिशादर्शक: भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वर शहरात दैनंदिन स्वच्छतेला प्राधान्य दिले जाईल आणि मार्गावर ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात येतील.

यंत्रणांमध्ये समन्वय: पहिल्या श्रावणी सोमवारी यशस्वी रीतीने गर्दी नियंत्रण करण्यात आले असून, आगामी सर्व सोमवारांसाठी प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन पूर्ण झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.